महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका
हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाच्या नावाने आता ओळखला जाऊ लागला आहे.
जगद्गुरू, थोर संन्याशी, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या कार्याने
प्रेरित होऊन
प. पू. शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम येथे १४ जानेवारी १९६५ रोजी
विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. किशोर वयातच भरपूर ज्ञान प्राप्त
झालेल्या शुकदास महाराजांनी या ज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी करण्याचे
ठरविले. सुरुवातीला विवेकानंद आश्रमाच्या अकोला, नागपूर, मुंबई, पातूर,
सस्ती, भौरद इत्यादी ठिकाणी शाखा होत्या. या प्रत्येक ठिकाणी जाऊन महाराज
लोकांना भेटायचे, मार्गदर्शन करायचे, व्याधीमुक्त करायचे. आता मात्र
प्रकृती अभावी हिवरा आश्रम येथेच महाराज लोकांना भेटतात व व्याधीमुक्त
करतात. आतापर्यंत १ कोटी रुग्णांना महाराजांनी व्याधीमुक्त केल्याचे
सांगितले जाते. त्यांच्या रुग्णसेवेस विज्ञानाची जोड असल्याने बुवाबाजी,
लिंबू, नारळ, अगरबत्तीला येथे थारा नाही. विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर
१५० एकरांचा आहे. गत ४७ वर्षांत या परिसराचे सौंदर्य बहरत चालले आहे.
महाराष्ट्र शासनाने या आश्रमास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे.
आजमितीला या ठिकाणी श्रीहर मंदिर, शिवजलाभिषेकाची पावनधारा, आशुतोष भगवान
शिव, श्रीहरी मंदिर, कोराडी प्रकल्पातील विवेकानंद स्मारक, भगवान बालाजी
मंदिर ही पर्यटनस्थळे भेट देणाèयांना आश्चर्यचकित करतात. यासोबतच
महाराजांनी दूरदृष्टी ठेवून परिसरातील व इतर ठिकाणच्या मुलांच्या
शिक्षणासाठी शिक्षणसंस्था व निवासस्थानाची व्यवस्था केली आहे. आश्रमाच्या
वतीने सध्या ज्ञानपीठ, कर्णबधिर मुलामुलींचे विद्यालय, अपंग मुला-मुलींचे
विद्यालय, विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, कृषी
व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय सुरू आहेत. दूरच्या
विद्याथ्र्यांना येथेच निवासाचीसुद्धा व्यवस्था असून आश्रमाच्या नियमानुसार
प्रवेश दिला जातो. शुकदास महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली दरवर्षी
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा
होतो. या वेळी हिवरा आश्रम येथेच यात्रा भरते. तीनही दिवस भरगच्च
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तर शेवटच्या दिवशी एकाचवेळी १५०
टड्ढॅक्टरची मदत घेऊन एकाच भव्य महापंगतीत भाविकांना प्रसाद वाटण्यात येतो.
लाखो भाविक दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेतात. यासोबतच दरवर्षी महाराजांच्या
वाढदिवशी आश्रमात सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा होतो. इतरही
वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर आश्रमाच्या वतीने उत्साहात साजरे होतात.
आतापर्यंत या आश्रमाच्या नयनरम्य परिसराला व महाराजांना शिवसेना नेते मनोहर
जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे,
केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, कै. विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर.
पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा
हजारे, धर्मभूषण सु. ग. शेवडे, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, ह.भ.प.
रामराव महाराज ढोक, डॉ. यशवंत पाटणे, सिंधुताई सपकाळ, प्राचार्य विठ्ठल
वाघ, रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, जगद्गुरू श्रीश्रीश्री १००८
डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य (वाराणसी), श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकर लिंग
शिवाचार्य महास्वामीजी, (केदारपीठ), श्रीमंत गिरीराज सूर्य सिंहासनाधिश्वर
श्रीश्रीश्री १००८ श्री शैल जगद्गुरू उमापती पंडिताराध्य शिवाचार्य
महास्वामीजींसह नामवंत व्याख्याने, प्रवचनकार, कीर्तनकारांनी भेट देऊन
कौतुक केले आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा दलित मित्र पुरस्कार देऊन
महाराजांच्या कार्याचा गौरव महाराज मिशन संलग्न गुणवंत चराटे सेवा
प्रतिष्ठान (मुंबई) द्वारा सेवा सम्राट पुरस्कार, दिवाळीबेन मेहता चॅरिटेबल
टड्ढस्ट (मुंबई) द्वारा सन्मानचिन्ह व रोख रक्कम श्री महालक्ष्मी देवस्थान
मुंबई, श्री मुंबादेवी संस्थान मुंबई, गुजराथी सेवा मंडळ माटुंगा, गावदेवी
संस्थान माटुंगा, अपना फाऊंडेशन ऐरोली (नवी मुंबई), श्री शंकर मठ मुंबई,
बुलडाणा जिल्हा मित्र मंडळ नागपूर, वारकरी शिक्षण संस्था आळंदी यासह अनेक
समाजसेवी संस्थांनी महाराजांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
दु:खितांची दु:खे हलकी करणे व सर्वांना आनंद देणे या कार्याला वाहून
घेतलेले शुकदास महाराज कोणत्याच देवाचे दर्शन घेत नाहीत, मंदिरात जात
नाहीत. याबाबत महाराज सांगतात ते पुढीलप्रमाणे…
ज्या मी देवाचा, आहे उपासक ।
करूनि ओळख, देतो त्याची
या इकडे तुम्ही, पाहा तो नयनी ।
नटला रुपांनी, दु:खीतांच्या
गरीब-अनाथ, अपंग-दलित ।
तोचि हा पतीत, झाला अज्ञ
शुकदास म्हणे, हेचि माझे देव ।
अर्पिला मी जीव, त्यांच्यासाठी
अशा या महान संतास व त्यांनी उभ्या केलेल्या नयनरम्य आश्रमास भेट
देण्यासाठी आल्यास निश्चितच वेगळे काही तरी शिकायला मिळेल यात शंका नाही.